चर्चा फक्त ‘भारत जोडो’ यात्रेची, राहुल गांधी यांचा साधेपणा लोकांना भावला

काँग्रेस नेते राहुल गांधी (#Rahul gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ‘भारत जोडो’ यात्रा सोमवार, सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पोहचत आहे. देगलूर (जि. नांदेड) येथे यात्रा दाखल होईल. महाराष्ट्रात १४ दिवसांत सहा लोकसभा आणि १५ विधानसभा मतदारसंघातून यात्रा जाणार आहे. यात्रेमुळे काँग्रेसचा (News tapu) जनाधार वाढेल, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, वाढती महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक मालमत्तांची विक्री, असहिष्णुता अशा मुद्द्यांवर प्रभावी भाष्य करीत राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेतून देश ढवळला आहे. दाक्षिणात्य राज्यात यात्रेला लक्षणीय पाठिंबा मिळाला आहे. यात्रेशी हजारो लोक जोडले गेले आहेत. तळागाळातील लोकांनी आपुलकीने राहुल यांची भेट घेत यात्रेला पाठिंबा दिला आहे. यात्रेमुळे देशभरात काँग्रेसची यंत्रणा सक्रिय झाली आहे. महाराष्ट्रात आलेल्या यात्रेला भाजपविरोधी पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
या यात्रेत महाविकास आघाडी सरकारचे घटक असलेले शिवसेना (News tapu)आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. (इतर लहान-मोठ्या पक्ष, संघटनांनी यात्रेला पाठिंबा दिला आहे. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात १४ दिवस प्रवास करणार आहे. सहा लोकसभा आणि १५ विधानसभा मतदारसंघातून यात्रेचा प्रवास आहे. देगलूर येथील नाक्यावर पोहचलेली यात्रा सकाळीच निघणार आहे.
यात्रेचे वेळापत्रक
७ ते ११ नोव्हेंबर – नांदेड जिल्हा
११ ते १५ नोव्हेंबर – हिंगोली जिल्हा
१५ ते १६ नोव्हेंबर – वाशिम जिल्हा
१६ ते १८ नोव्हेंबर – अकोला जिल्हा
१८ ते २० नोव्हेंबर – बुलडाणा जिल्हा
सात ते २० नोव्हेंबरपर्यंत यात्रा महाराष्ट्रात असेल. यात्रा काँग्रेसला काय देणार असा सवाल विरोधकांनी केला आहे. तर ही राजकीय यात्रा नसून देशहिताची यात्रा आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधी करीत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. देशातील मुख्य माध्यमांनी राहुल यांच्या यात्रेला पुरेसे ‘कव्हरेज’ दिले नसल्याने टीकेची झोड उठली आहे. तर समाजमाध्यमांच्या आणि जनतेच्या बळावर यात्रा यशस्वी करू, असा विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या यात्रेमुळे पुढील तेरा दिवस महाराष्ट्रात राजकीय धुरळा उठणार आहे.